राज्यामध्ये अनेक लोकांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. अनेक प्रकरणांमध्ये कारण नसताना पुरुषांना अडकवले जात आहे. पुरुषांचे सुद्धा संरक्षण झाले पाहिजे यासाठी राज्य शासनाने पुरुष आयोगाची स्थापना करणे गरजेचे आहे. या आयोगाचे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन केला पाहिजे अशी मागणी आकाश पुजारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, सध्या राज्यामध्ये कारण नसताना पुरुषांवर सुद्धा अनेक वेळा अन्याय होत आहे. काही महिलांकडून जाणीवपूर्वक पुरुषांच्या वर नाहक बदनामी केली जात आहे. तरी शासनाने पुरुष आयोग स्थापन करून पुरुषांना न्याय मिळावा यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली पाहिजे. राज्यामध्ये स्त्री-पुरुष समानता असणे गरजेचे आहे